पुणे – मागील दहा दिवसांत रेल्वेच्या माध्यमातून तब्बल 11 हजार जण पुण्यात दाखल झाले आहेत. या सर्वांना घरीच विलग केले आहे. त्यांच्या आरोग्याची दररोज फोनवरून माहिती घेण्यात येत आहे.
पुण्यात आलेल्या या नागरिकांमध्ये दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, दक्षिणेतील राज्यातून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, यामध्ये अद्याप एकही बाधित आढळला नाही.
मजूर, पर्यटन, इतर कौटुंबिक कारणांस्तव परराज्यांत गेलेल्यांना आपल्या राज्यात परत येण्यासाठी विमान, रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.