नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राम राम करत १०० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संघाने आमचा केवळ वापर करून घेतला. संघ परिवारात मुस्लिम लोकांना केवळ “शोपीस’ म्हणून स्थान असल्याचा आरोप, त्यांनी केला आहे.
संघाने काही वर्षांपूर्वी देशपातळीवर मुस्लिम समाजात काम वाढवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच स्थापन केला. या मंचाचे नेतृत्व संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेशकुमार यांच्याकडे आहे.
लोकसभा निवडणुकीत मंचाने भाजपसाठी काम हाती घेतले असताना नागपुरात मात्र असंख्य कार्यकर्त्यांनी संघावर आरोप करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंचाचे जिल्हा संयोजक रियाझ खान यांच्या नेतृत्वात १०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, हे सर्व कार्यकर्ते आता नागपूरमध्ये काँग्रेसकडून लोकसभेचे उमेदवार नाना पाटोले यांच्या प्रचाराच्या तयारीला लागले आहेत.