नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देताना अमृता यांनी त्यांना भारताचे पितामह म्हणून मोदींचा उल्लेख केला. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर चांगलीच टीका करण्यात येत आहे.
यावर आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विधान केले आहे. ते म्हणाले की ‘फक्त महात्मा गांधीच या देशाचे पिता आहेत’ मात्र, फक्त प्रसिद्धीसाठी अमृता यांनी तसा उल्लेख केला आहे, आणि त्यांना जर त्यांना मोदी हे देशाचे पिता वाटत असतील तर त्यांनी त्या समजूतीमध्ये रहावे’, असा टोला खर्गे यांनी लगावला आहे.