शालेय पोषण अभियान रथावर पंतप्रधानांचे नाव न लावल्यास आंदोलन
नगर – केंद्र सरकारने पोषण अभियानाच्या रथावर नरेंद्र मोदी यांच्या चित्राचा विसर जिल्हा परिषदेला पडला असून जाणीवपूर्वक केले असल्याचा आरोप भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. भारत देशात कोणीही व्यक्ती कुपोषित राहू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8मार्च 2018 ला राजस्थान च्या झुझुन येथून पोषण अभियानाला सुरुवात केली.
आपल्या देशातील गरीब घरात कुपोषित बालके जन्माला येतात. त्यासाठी पोषक आहार देण्यात यावे यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने चित्ररथ तयार केला आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने या अभियानात हा चित्ररथ तयार केला यावर महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महिला बालकल्याणमंत्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ राजश्री घुले, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मिराताई शेटे यांचे चित्र आहे मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्राचा विसर पडला आहे खरे म्हणजे मुद्दाम जाणीवपूर्वक टाळले असून कोणत्याही सरकारी जाहिरात अथवा कार्यक्रमात पंतप्रधान यांचे चित्र लावणे बंधनकारक आहे मात्र जिल्हा परिषदेचे पदाधिकारी हे आचारसंहिते चे उल्लंघन करीत आहे.
जिल्ह्यात फिरणारा पोषण रथ तातडीने मागे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो लावून मग हे अभियान सुरू करावे अन्यथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांच्या दालनासमोर अभिनव आंदोलन करण्यात येईल असा इशारा वाकचौरे यांनी दिला आहे.