मुंबई – भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 2011 साली झालेल्या विश्वकरंडक विजयाला उजाळा देताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना टॅग करत आभिनंदन केले. त्यावर नाराज झालेल्या युवराजसिंगने रवी सर मी आणि महेंद्रसिंग धोनी देखील त्या संघात होतो असे सांगत उपरोधिक टोमणा मारला. त्यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2 एप्रिल 2011 रोजी श्रीलंकेचा पराभव करत विश्वकरंडक जिंकला होता. 1983 नंतर 28 वर्षांनी करंडक पुन्हा भारतात आला. या विजयाच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट शास्त्री यांनी केली होती. मात्र, त्याला केवळ सचिन आणि कोहली यांनाच टॅग केल्याने युवराज नाराज झाला व त्याने शास्त्रींना टोमणा मारला. रवीसर तुम्ही आमच्यासाठी ज्येष्ठ आणि आयडॉल आहात. मला आणि धोनीला देखील पोस्टमध्ये टॅग केले असते तर आनंद वाटला असता.
शास्त्रींची सारवासारव …
युवी नाराज होऊ नकोस, तू आणि माही महान खेळाडू आहात. तुम्हाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, अशी सारवासारव शास्त्री यांनी केली, मात्र तरीही शास्त्री ट्रोल झाले.