मुंबई – भारताच्या 2011 विश्वचषक स्पर्धेतील विजयात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा तसेच आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची मने जिंकण्याऱ्या भारतीय स्टार क्रिकेटर व डावखुरा फलंदाज युवराज सिंगने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या निर्णयामुळे समस्त क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू असून युवराजच्या निवृत्तीने सर्वांचे त्याच्याकडे लक्ष वेधले.
Yuvraj Singh announces retirement from International cricket pic.twitter.com/RQbumXn4Pa
— ANI (@ANI) June 10, 2019
निवृत्तीची घोषणा करतेवेळी युवराज भावुक झाला होता. घोषणा करताच त्याचे डोळे पाणावले. ‘माझी आई, माझी शक्ती’ असल्याचे म्हणत त्याने आईचे, पत्नीचे परिवाराचे, चाहत्यांचे, मित्र-मंडळींचे, भारतीय संघाचे तसेच आपल्या डॉक्टरांचे विशेष आभार मानले.
Yuvraj Singh: After 25 years in and around the 22 yards and almost 17 years of international cricket on and off, I have decided to move on. This game taught me how to fight, how to fall, to dust off, to get up again and move forward pic.twitter.com/NI2hO08NfM
— ANI (@ANI) June 10, 2019
युवराज सिंग याने भारतासाठी आपल्या कारकिर्दीत एकूण 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामने खेळले. भारताच्या 2011 विश्वचषक स्पर्धेतील विजयात अतिशय महत्त्वाची भूमिका त्याने बजावली होती. निवृत्त होण्याची ही योग्य वेळ असल्याचे म्हणत त्याने 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत मिळालेला सामनावीर किताब स्वप्नवत असल्याचे सांगितले. साल 2007 मध्ये टी-20 विश्वचषकात युवराजने एका षटकांत 6 षटकार लगावले होते. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एका षटकात 6 षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज आहे. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्राॅडच्या गोलंदाजीवर त्यांना हा विक्रम केला होता.
The man who starred in India's 2007 World T20 and 2011 World Cup victories, @YUVSTRONG12 announces his retirement from International cricket.
What's your favourite #YuvrajSingh moment in international cricket? pic.twitter.com/7Bw5LnwOFG
— BCCI (@BCCI) June 10, 2019
माझ्या कारकीर्दीच्या शिखरावर मला कर्करोगाने गाठले मात्र त्यावर मात करून मी मैदानात परतलो, असंही तो म्हणाला. कर्करोगावर मात केल्यानंतर 2012 साली झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 2013 सालच्या मालिकेत त्याला संधी मिळाली. पण, त्याला 2015 सालच्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही.
युवराजने आपल्या कारकिर्दीत 304 एकदिवसीय सामन्यात 8,701 धावा केल्या त्यामध्ये त्याने 14 शतके व 52 अर्धशतके झळकावली. तर गोलंदाजीत 111 विकेट्स त्यांनी आपल्या नावे केल्या आहेत. त्याने नैरोबी येथे केनिया विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपले क्रिकेट पदार्पण केले.
युवराज सिंगने 40 कसोटी सामन्यामध्ये 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या त्यामध्ये त्याने तीन शतक व 11 अर्धशतक झळकावली आहेत. कसोटीत त्यांच्या नावे 9 बळी देखील आहेत. मोहाली येथे न्यूझीलंड विरुद्ध त्याने कसोटीत पदार्पण केले.
त्याने 58 टी 20 सामन्यात 8 अर्धशतकासह 1177 धावा केल्या आहेत. तर 28 विकेट देखील त्याच्या नावे आहेत.