मुंबई : राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे चित्र आहे. तर राष्ट्रवादीने कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा पटकावत आपले स्थान अधिक भक्कम केले. तर हरियाणातील निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजपा समान जागा मिळवून सरकार बनवण्याच्या स्पर्धेत आहेत.
महाराष्ट्रात बहुमतासाठी 145 सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपाने सुमारे 95 जागांवर आघडीवर आहे. तर शिवसेना 64 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. 2014 मध्ये भाजपाला 122 जागांवर विजय मिळाला होता. तर शिवसेना त्यावेळी 63 जागा मिळाल्या होत्या. तर कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या जागांत 10ने वाढ झाली.
दरम्यान, भाजपाच्या पूर्ण बहुमतापासून दूर असल्याचे लक्षात येताच शिवसेने पुन्हा सत्तेत समान वाट्याची मागणी पुन्हा पुढे रेटली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, युती पुन्हा सत्तेवर येईल. पण आम्ही 50:50 सत्तेच्या वाट्यावर कायम आहोत.
शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदावरही दावा केला आहे. आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. ते न दिल्यास कॉंग्रेस, राष्ट्रवादी हे शिवसेनेला बाहेरून पाठींबा देऊन सरेकार बनवेल अशीही शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त होत आहे.