नवी दिल्ली – भारतीय संघाचे लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि अष्टपैलू कृष्णाप्पा गौतम श्रीलंकेहून मायदेशी परतले आहेत. श्रीलंकेच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेदरम्यान करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हे दोन्ही खेळाडू संघासह परतू शकले नव्हते. आता दोघेही करोनामुक्त झाल्यानंतर भारतात परतले आहेत.
भारतात आल्यावर चहलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक छायाचित्र पोस्ट केले, जेथे त्याने त्याच्या चाहत्यांना आपल्या तब्येतीबद्दलचे अपडेट दिले आहे.
या दौऱ्यात चहलने दोन एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळला होता. या सामन्यांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली होती. विशेष म्हणजे, दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी अष्टपैलू कृणाल पांड्या करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते.
यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या क्रिकेटपटूंना इतर संघापासून वेगळे केले गेले. यानंतर संघ घरी परतण्याच्या अगदी आधी चहल आणि गौतम पॉझिटिव्ह आढळले होते.