लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यामध्ये आज (दि.6 मे) मतदानाला जोरदार सुरवात झाली आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्मीरमधील 2, झारखंडमधील 4, मध्यप्रदेशातील 7, राजस्थानातल्या 12, उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील 7 अशा एकूण 51 मतदारसंघांसाठी आज मतदान होणार आहे. यासाठी देशाचे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ यांनी देखील मतदारांना मतदान करण्याची विनंती केली आहे.
“आपले मत म्हणजे लोकशाही समृद्ध करण्याचा आणि भारताच्या भविष्यामध्ये योगदान देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे”. असं मोदींनी म्हंटल आहे. दरम्यान, मोदींनी मी आशा करतो की माझ्या तरुण मित्रांना रेकॉर्ड नंबरमध्ये स्थान मिळेल. अशी इच्छा देखील बोलून दाखवली आहे.
Requesting all those voting in today’s fifth phase of the 2019 Lok Sabha elections to do so in large numbers.
A vote is the most effective way to enrich our democracy and contribute to India’s better future.
I hope my young friends turnout in record numbers.
— Narendra Modi (@narendramodi) May 6, 2019
निवडणुकीच्या आजच्या टप्यात भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, स्मृती इरणी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, जतिन प्रसाद आणि सपा नेत्या पूनम सिन्हा या नेत्यांचे भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंदिस्त होणार आहे.