नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पंचायत समितीच्या नुकत्याच निवडणूक पार पडल्या. मात्र या निवडणुकीत १३५ शिक्षकांचा निवडणुकीची काम करतेवेळी मृत्यू झाला. याप्रकरणी उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला जाब विचारत चांगलेच फटकारले आहे. तुमचा बेजवाबदारपणा १३५ शिक्षकांचा जीव घेऊन गेला आहे असे मतदेखील न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. एका जनहित याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडणूक आयोग, पोलिस दोघांनी कोरोना नियमांचे पालन केले नाही, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. ‘निवडणूक आयोगाचे न्यायालयात हजर राहून याचा जाब द्यावा,’ असे उच्च न्यायालयाने सरकारला सुनावले आहे. पुढील निवडणुकीत असा प्रकार झाला तर संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात नुकत्याच पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. यात निवडणुक प्रक्रियेत सहभागी असलेल्या १३५ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकार हतबल झाले आहे. त्यामुळे पंचायत निवडणुकीत सरकार सक्रिय झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे या शिक्षकांचा मृत्यू झाला.
तुमच्या बेजबाबदारपणामुळे लोकांचा असा मृत्यू झाला तर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही.”राज्यात मी म्हणेन तसेच चालेल. अन्यथा कोणाचेही काहीही चालणार नाही, या भूमिकेतून सरकारने आता बाहेर पडावे, दुसऱ्याच्या विचाराला महत्व द्या,” असे न्यायालयाने म्हटलं आहे. ऑक्सीजन, बेडची कमतरता, रेमडेसिविरचा तुटवठा, त्याचा काळाबाजार याबाबत न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहे.