नगर (प्रतिनिधी) – आजच्या युवा पिढीने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले पाहिजे. शासनाच्या विविध योजना आहेत, या योजनांचा पाठपुरावा करून सर्वसामाण्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे केले जाते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
तपोवन रोडवरील एसटी कॉलनीतील विघ्नहर्ता महिला मंडळास पाण्याची टाकी भेट देताना आली. यावेळी ते बोलत होते. नगरसेवक गणेश भोसले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, सचिव तनवीर मनियार, जिल्हा उपाध्यक्ष संतोष ढाकणे, सज्ञाद बागवान, संदीप वाघमारे, पवन काळे, संगिता बारवेकर, शोभा गाडे, ज्योती काळे, जया दरंदले आदी उपस्थित होते.
यावेळी मनियार म्हणाले की, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याच परिसरातल विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी नागरिकांना पर्याय माहित नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहतात. यासाठी आम्ही आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रश्न सोडविण्याचे काम करत आहोत. या पुढील काळात प्रलंबित प्रश्नही मार्गी लावू, असे ते म्हणाले. महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी यासाठी कायमस्वरुपी पाण्याचा प्रशन मार्गी लागावा म्हणून तपोवन येथे पाण्याची टाकी भेट दिली आहे. या माध्यमातून नियमित पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.