नवी दिल्ली : देशाच्या सध्याच्या स्थितीवरून युवा पिढीत मोठी अस्वस्थता असून देशाच्या भवितव्याबाबत ही पिढी मोठ्या चिंतेत आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ एका महिला विद्यार्थ्याने पॉंडेचरी विद्यापीठाचे सुवर्णपदक स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्या विद्यार्थिनीच्या धाडसाचेही येचुरी यांनी कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की एका 24 वर्षीय जर्मन विद्यार्थ्याला सरकारच्या विरोधातील निदर्शनांमध्ये भाग घेतल्याबद्दल देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे.
देशाचे भवितव्य ज्या युवा पिढीच्या हातात आहे ती पिढीच सध्या दोलायमान अवस्थेत असून त्यांना देशाच्या एकूणच भवितव्या विषयी चिंता लागून राहिली आहे आणि ती अतिशय रास्त आहे.
लोकांचा आवाज दाबून टाकणाऱ्या सरकारच्या कृतीचा निषेध करून येचुरी यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की घटनेने स्थापित झालेले हेच भारतीय प्रजासत्ताक आहे काय असा प्रश्न आज लोकांना पडला आहे. रबिया अबदुरेहीम या केरळातील विद्यार्थिनीला तिच्या विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाला जाण्यापासून रोखण्यात आले. हा पदवीप्रदान समारंभ राष्ट्रपती रामनाथ किोंवंद यांच्या उपस्थितीत झाला होता.
याच विद्यार्थिनीने विद्यापीठाने तिला जाहींर केलेले सुवर्णपदक स्वीकारण्यास नकार दिला होता. पण ती केवळ त्या समारंभाला उपस्थित राहु इच्छित होती हा भीषण प्रकार असल्याचे येचुरी यांनी म्हटले आहे.