नवी दिल्ली – देशात कोठेही डिटेन्शन सेंटर अस्तित्वात नाही असे भलेही पंतप्रधान म्हणाले असतील तरी आसाममध्ये गोलपाडा येथे सर्वात मोठी स्थानबद्धता छावणी (डिटेंशन सेंटर) निर्माण केली जात आहे.
RSS का प्रधानमंत्री भारत माता से झूठ बोलता हैं ।#JhootJhootJhoot pic.twitter.com/XLne46INzH
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 26, 2019
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलत आहेत असल्याचा आरोप केला ट्विटद्वारे केला आहे. या मुद्द्यावरून आज वृत्त माध्यमांशी बोलतांना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.
Rahul Gandhi on BJP accusing him of lying: I have tweeted a video where Narendra Modi is saying that there are no detention centres in India, and in the same video there are visuals of a detention centre, so you decide who is lying. pic.twitter.com/1oOBOnEQPG
— ANI (@ANI) December 28, 2019
राहुल गांधी म्हणाले,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना कुठेही स्थानबद्धता छावणी उभारली जात नसून काँग्रेस करत असलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. मात्र या संबंधित रिपोर्ट व्हिडीओ मी ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलत आहेत की नाही हे तुम्ही ठरवा देशात देशात डिटेन्शन सेंटर अस्तित्वात आहे की नाही हे तुम्ही ठरवा, असा सवालही राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलतांना केला आहे.