मुंबई – राष्ट्रवादीशी बंडखोरी करत अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केली. परंतु, चार दिवसातच भाजप-अजित पवार सरकार कोसळले. अजित पवारांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. याबद्दल अनभिज्ञ असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले होते. मात्र ही सर्व खेळी राजकारणातील अनुभवी चाणक्य शरद पवार यांचीच असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. या चर्चांना आता अप्रत्यक्षपणे दुजोरा मिळण्यास सुरुवात झाली आहे.
काँग्रेस नेता जितेंद्र देहाडे यांनीही म्हंटले कि, तु आया नहीं था..तुझे लाया गया था। राष्ट्रपती राजवट हटाने के लिये !!!, असे ट्विट केले आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या ट्विटवरुन पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
तु आया नहीं था..तुझे लाया गया था #राष्ट्रपती_राजवट हटाने के लिये !!!
— Dr. Jitendra Dehade (@jitendradehade) November 26, 2019
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून 23च्या मध्यरात्री सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. त्यानंतर पहाटे 5 वाजून 47 मिनिटांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली. सकाळी आठ वाजता या दोघांचा शपथविधी झाला. या पार्श्वभूमीवर जितेंद्र देहाडे यांच्या ट्विटला महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, याआधी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांच्या नावाचे असलेल्या एका फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होतं’. यासोबतच शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो शेअर करण्यात आलेला आहे.