मुंबई – करोना रोखण्यासाठी केंद्र शासनाने ज्या गाईडलाईन दिल्या त्यासुध्दा राज्यसरकारने प्रभावीपणे आमलात आणल्या नाहीत. रुग्णांना योग्य उपचार करण्यात शासन अपयशी ठरले आहे. तसेच अद्याप कोणतेही आर्थिक पॅकेज दिलेले नाही.
महाविकास आघाडीच्या सुस्त शासनाने जागे होण्याची आवश्यकता आहे असं म्हणत राज्यभरातील भाजप कार्यकर्ते व नागरिक घराबाहेर फलक, काळे झेंडे फडकवतील, काळ्या फिती लावतील आणि सरकारचा निषेध करीत निदर्शने करतील असे असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचे बळ आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरी ताकद आपण सर्व @NCPspeaks चे सदस्य आहात. तुम्हा कार्यकर्त्यांशी ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ या अभियानांतर्गत दिनांक २२ मे रोजी सायंकाळी ४ वाजता महासंवाद साधणार आहे. https://t.co/EzYzCnDfFX
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) May 20, 2020
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील
‘हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा, आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना! आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना ?’ असा विचारही जनतेने मनात आणावा अशा आशयाचे ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.