मुंबई – मागील काही दिवसांपासून मंदिरं सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. अशातच मंदिर खुली करण्यासाठी आज भाजपने पुन्हा एकदा घंटानाद आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत काही प्रश्न उपस्थित केले.
राज्यपालांनी एकीकडे सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहेत. तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच ठेवले आहे. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे.
हे नक्की वाचा : ‘माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही’- मुख्यमंत्री
तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही आयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुख्मिणीचीही पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी, असे राज्यपालांनी पत्रात म्हंटले आहे.
Maharashtra Governor wrote to CM Uddhav Thackeray, seeking re-opening of places of worship with COVID precautions
“I wonder if you’re receiving any divine premonition to keep postponing re-opening or you’ve suddenly turned ‘secular’ yourselves, the term you hated?” letter states pic.twitter.com/BedTgTSP2d
— ANI (@ANI) October 13, 2020
दरम्यान, मंदिर बंद ठेवण्याची आमची इच्छा नाही, मात्र उघडलेल्या दारातून समृद्धी आली पाहिजे करोना नको, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी सांगितले होते.