मुंबई – पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. शरजीलच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राजकीय नेत्यांनी तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भाजप या मुद्दावर आक्रमक असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेच तक्रार केली आहे.
A case has been registered against Sharjeel Usmani at Lucknow’s Hazratganj Police Station in connection with his speech at Elgar Parishad, in Pune Maharashtra.
— ANI UP (@ANINewsUP) February 4, 2021
यातच एनआयए वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी यांच्या विरोधात लखनऊ येथील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मविआ सरकारवर टीका केली असून राज्यात येऊन कोणीही हिंदुंना काहीही बोलत आहे. राज्यात केवळ महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे हिंदूंना वाली नाही. सरकार काही करणार आहे की नाही? असा सवाल पाटील यांनी केला होता. हिंदुत्वावर टीका करणाऱ्या शरजील उस्मानी याच्याविरोधात महाराष्ट्रानंतर आता लखनऊमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच त्याच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.