प्रभात ऑनलाइन – आपल्याकडे साधारण पुरुषसत्ताक अशी समाजरचना दिसून येते. घर, व्यवसाय, लग्न इत्यादींशी संबंधित प्रत्येक निर्णयही पुरुषच घेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की जगात अशा काही जमाती आहेत जिथे केवळ स्त्रियांचेच वर्चस्व आहे? होय, हे सत्य आहे.
आज महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा अशा काही ठिकाणांची माहिती देत आहोत जिथे पुरुषांचे वर्चस्व नाही, तर फक्त महिलांचेच राज्य चालते. कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक निर्णय केवळ महिलांचे घेतात. चला तर मग अशाच काही जमातींबद्दल जाणून घेऊ.
1. इम्फाल इमा मार्केट
इंफाळमधील मणिपूरचे ‘इमा मार्केट’ किंवा ‘मदर मार्केट’ केवळ महिलाच चालवतात. येथे पुरुषांना वस्तू खरेदी करण्याशिवाय विक्री करण्याची परवानगी नाही. ही आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, येथे सुमारे 4000 महिला काम करतात. मणिपूरच्या भाषेत इमाला ‘मदर मार्केट’ देखील म्हणतात. विशेष म्हणजे केवळ विवाहित महिलाच या बाजारात व्यापार करू शकतात. येथे भाजीपाला, कपड्यांपासून आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सहजपणे मिळतात.
2. मोशो ट्राइब, चीन
चीन आणि तिबेटच्या काही भागात महिलांचे राज्य आहे. मोसू जमातीतल्या या स्त्रिया स्वत: घर आणि व्यवसाय चालवतात. त्या पुरुषांप्रमाणे प्रत्येक प्रकारचे निर्णय घेता. या जमातीच्या स्त्रियांना लग्नापूर्वी कोणत्याही पुरुषाबरोबर राहण्याचा हक्क आहे. तसेच, ती तिच्या जोडीदाराचा स्वत: च्या इच्छेनुसार शोध घेऊ शकते. पुरुषांबद्दल बोलायचं तर ते त्यांच्या महिला मित्रांबरोबर किंवा चक्क जनवारांच्या गोठ्यात, तबेल्यात राहतात. स्त्रियांच्या वर्चस्वामुळे या जमातीची मुले स्वतःच्या नावापुढे वडिलांच्या ऐवजी आईचेच नाव लावतात.
3) गरासिया जमाती, राजस्थान
या जमातीमध्ये मुला-मुलींना लग्न न करता थेट संबंधात राहण्याची परवानगी आहे. येथील स्त्रिया त्यांच्या आवडीच्या कोणत्याही पुरुषाबरोबर राहू शकतात. तसेच विवाह करण्याचा निर्णय महिला घेतात. इथले लोक शेतीवर अवलंबून असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थिर झाल्यावरच लग्न करण्याचा निर्णय घेतात. इथे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या मुलाचे कुटुंबिय त्या मुलीला पैसे देतात. तसेच लग्नापर्यंत गोष्ट पोहोचल्यावर लग्नात येणारा सर्व खर्च मुलाच्या कुटूंबाच्या वतीने केला जातो.
4) गारो, मेघालय
गारो जमातीचे लोक मेघालय, नागालँड आणि आसाम जिल्ह्यांत जसे कार्बी आंग्लॉन्ग, गोलपारा इत्यादी भागात राहतात. या व्यतिरिक्त ते पश्चिम बंगालच्या कूच बिहार, जलपाईगुडी, बर्धमान आणि दिनाजपूर जिल्ह्यातही राहतात. गारो व्यतिरिक्त त्यांना मंडे देखील म्हणतात. इथल्या घराच्या मालमत्तेवर आई आणि मुलीचा अधिकार असतो. मुलगी आईनंतर वारस मानली जाते. याउलट, घरातील पुरुषांना कोणत्याही कामात आणि मालमत्तेत अधिकार नाही. तसेच ते घर आणि मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. लग्नानंतरही मुलाला पत्नीच्या घरातच राहावे लागते आणि तिचे सर्व निर्णय मान्य करावे लागतात. येथील महिला कोणत्याही प्रकारच्या सामाजिक बंधनांनी बांधल्या जात नाहीत, तर स्वतंत्र राहतात.