नवी दिल्ली – अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहावर आता आणखी एक नामुष्की ओढवली आहे. रिलायन्स समूहाने कर्ज थकविल्याने येस बँकेने कठोर कारवाई केली आहे.
येस बँकेने मुंबईतील सांताक्रूझ येथील रिलायन्सचे कार्यालय जप्त करण्यासाठी नोटीस ऑफ पझेशन पाठवली आहे. रिलायन्सच्या मुख्यालयासोबतच मुंबईतील अन्य दोन कार्यालयांनाही अशा प्रकारची नोटीस बँकेने पाठवली आहे.
अनिल अंबानी सध्या आर्थिक संकटातून जात असून मागील काही वर्षांपासून त्यांना कंपनीचे अनेक भागांची विक्री करावी लागली. येस बँकेने म्हंटले कि, बँकेने रिलायन्सला २ हजार ८९२.१४ कोटींचे कर्ज दिले होते. कर्ज फेडण्यासाठी ६० दिवसांची नोटीसही देण्यात आली होती. मात्र, रिलायनान्स कर्ज फेडले नाही. यामुळे त्या कर्जाच्या वसुलीसाठी क्रमवार पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
दरम्यान, नागिन महाल येथील रिलायन्सच्या कार्यालयाचे दोन मजले बँकेने आपल्या ताब्यात घेतले आहेत. थकबाकीदाराची संपत्ती जप्त करून त्याची विक्री करून आपल्या कर्जाची भरपाई करण्याचा बँकेला अधिकार असल्याचेही येस बँकेने स्पष्ट केले