पुणे : हवामान विभागातर्फे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, या वेळी विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सॅटेलाइट इमेजनुसार कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात पावसाचे दाट ढग साचले आहेत.
परिणामी महाराष्ट्र तील बहुतांश भागावर त्याचा प्रभाव दिसून येत असून, विदर्भात येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे विदर्भाच्या नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.