मुंबई : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून परतीच्या पावसासाठी सर्वत्र पोषक वातावरण तयार झाले आहे. सध्या जरी पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे वगळत अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पाच ते दहा ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून परत फिरणार आहे. अशातच आज हवामान विभागाने राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आज विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच माघारी परतला आहे.
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता कमी आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाची शक्यता कमी आहे.