मुंबई – बॉलीवूडमध्ये सध्या अभिनेत्री यामी गौतमीची बरीच चर्चा दिसून येते. ती अत्यंत वेगाने सिनेसृष्टीत आपला जम बसवत आहे. चाहत्यांच्या तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि यामीही त्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे. यातच नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये यामी गौतमला ‘बाला’ सिनेमासाठी नामांकन न मिळाल्याने तिचे फॅन्स नाराज झाले आहेत. फॅन्सची नाराजी दूर करण्यासाठी यामीने सोशल मीडियावर खुलं पत्र लिहीत शेअर केले आहे.
यामीने या पात्रात लिहिले आहे की, ‘खरं सांगायचं तर पुरस्कार मिळाल्यानंतर आत्मविश्वास आणखी वाढतो. त्यापेक्षाही जर एखाद्या पुरस्कारासाठी नामांकन मिळणं तुमची क्षमता आणि मेहनतीप्रति प्रेमाचं स्वरूप असतं. ज्युरी मेंबर्सनी सिनेसृष्टीमध्ये मोठं योगदान दिलं आहे त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करते, एवढ्या वर्षात मला इंडस्ट्री, क्रिटिक्स, मीडिया, प्रतिभावान सहकलाकार आणि मुख्यत: प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम आणि विश्वास मिळाला आहे, तो माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. यासाठी तुम्ही कुठून आले आहात, कोण आहात या गोष्टींमुळे फरक पडत नाही. फक्त हार न पत्करता पुढे जाणं जरूरी आहे.’
दरम्यान, ही पोस्टची सोशल मीडियावर चांगली चर्चेत आहे. यामीच्या फॅन्ससह बॉलिवूड सेलेब्सनेही यामीची पोस्ट लाईक करत कमेंट्समध्ये तिचे कौतुक केले आहे. यामीने पोस्ट केलेल्या पत्राला विक्रांत मेसी, आयुष्मान खुराना, काजल अग्रवाल, वरुण धवन, दिया मिर्झा, ताहिरा कश्यप आणि आदित्य धर यांनी लाईक केलं आहे. यामीचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स देखील या सर्वांनी केल्या आहेत.