नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयावरही आता कुरस्तीपटूंनी आक्षेप घेतला आहे. आम्हालाच अंधारातून ठेवून ही समिती स्थापन करण्यात आल्याची टीका आंदोलनातील प्रख्यात कुस्तीपटू बजरंज पुनिया याने माध्यमांशी बोलताना सागितले.
“माहिती घ्या, अभ्यास करा व मगच बोला…”,रोहित शर्माने सुनावले माध्यमाना खडेबोल
या प्रकरणाची समिती नेमून चौकशी केली जाणार असून महासंघाची निवडणूक होऊन नवे पदाधिकारी नियुक्त होत नाही तोपर्यंत माजी आंतरराष्ट्रीय महिला मुष्टोयोद्धा एम. सी. आशा कोणतीही समिती नियुक्त करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा केली जाईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात क्रीडा खात्याकडून असे काहीच सांगितले गेले नाही व त्यांनी थेट नियुक्ती जाहीर केली. त्यामुळे आम्ही निराश झालो आहोत, असे बजरंगने म्हटले आहे. विशेष म्हणजे हे मत ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रिय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनाही टॅग केले आहे.
Suryakumar Yadav | सूर्याने रचला इतिहास! ‘हा’ पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला
बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया आणि विनेष फोगट यांनी अनुराग ठाकूर यांची भेट घेतली व त्यात ब्रिजभूषण यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली. तसेच त्यांना पदावरून हटवले जाऊन नवी निवडणूक घेत नवे पदाधिकारी महासंघावर नियुक्त होत नाहीत तोपर्यत हे आंलोदन सुरुच राहील, असेही सांगितले होते.
त्यानंतर ठाकूर यांनी बॉक्सर मेरी कोम अध्यक्ष असलेली पाच सदस्यांची समिती जाहीर केली. त्यात ऑलिंपिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त, माजी बॅटमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे टॉप्स योजनेचे सीईओ राजगोपालन आणि साईचे कार्यकारी संचालक राधिका श्रीमान यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच ही समिती जाहीर करताना ठाकूर यांनी ब्रिजभूषण यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून चौकशी होईपर्यंत दूर केले आहे आणि मेरी कोम यांच्या समितीकडेच संघटनेचे दैनंदिन कारकाज सोपवले होते.
गीता फोगटचे पंतप्रधानांना विनेदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता या प्रकरणात हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवावे, अशी मागणी वजा निवेदन अव्वल कुस्तीपटू गीता फोगट हिने केले आहे. देशातील सर्व बहिणी आणि मुली तुमच्याकडे आशेने पाहत आहेत. तूम्हीच आता न्याय द्या, असेही गीता हीने या निवेदनात म्हटले आहे.