जगासह भारतातही करोनाने थैमान घातले असून गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित केले होते. या संबोधनात त्यांनी देशाला “आत्मनिर्भर’ होण्याचा मंत्र दिला होता.
देशातील सर्वसामान्यांना अधिकाधिक प्रमाणात स्वदेशी वस्तु वापरण्याचे आवाहन मोदींनी केले होते. आता मोदींच्या या मंत्रावर आधारित बॉलीवूडमध्ये एक चित्रपट साकारण्या येणार आहे.
काही माध्यमांच्या वृत्तानुसार या चित्रपटाचे नाव “वाह जिंदगी’ असे असेल. या चित्रपटात संजय मिश्रा आणि विजय राज यांच्यासारख्या कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत.या चित्रपटाची पटकथा ही अशा एका व्यक्तीवर आधारित आहे ज्याला आपल्या स्वदेशी वस्तू बनवण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी परदेशी वस्तूंसह बाजारपेठेत जोरदार स्पर्धा करावी लागत आहे.
या चित्रपटाची कथा प्रामुख्याने “मेक इन इंडिया’ या संकल्पनेला प्रोत्साहन देणारी असेल. “वाह जिंदगी’चे दिग्दर्शन दिनेशसिंह यादव करणार आहेत. तर, अशोक चौधरी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. आशा आहे की, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.