सविंदणे : दोन महिन्यांपूर्वी आण्णापूर ते रामलिंग या ५ कि.मी रस्त्याचे, चार कोटी रुपये एवढा मोठा खर्च असलेल्या रस्त्याचे नित्कृष्ठ काम केल्याने पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ता खचून तडे गेले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष पसरला आहे.
मध्यंतरी १७ जानेवारी 2020 रोजी याच रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी आण्णापुर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश यशवंत वाळुंज यांनी उपोषण केले होते. तदनंतर या रस्त्याच्या कामास सुरुवात केली गेली. सुरुवातीपासूनच रस्त्याच्या अनेक तक्रारी केल्या होत्या. सध्याचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत वरीष्ठ पातळीवर सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी तक्रार निलेश वाळुंज यांनी सामाजिक बांधकाम विभाग मंत्री मा.श्री अशोकराव चव्हाण आणि अधीक्षक अभियंता पुणे यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.
प्रशासनाने लक्ष घालून सहकार्यं करावे आणि सा.बां.विभाग शिरूर सहा.अभियंता श्री मयूर सोनवणे व अधिकारींची चौकशी करून बदली दुसरे अधिकारी यावेत जेणेकरून स्थानीक पातळीवर होणारी कामे चांगल्या पद्धतीने होतील आणि सध्याच्या कामाची चौकशी योग्य प्रकारे होईल. तसेच याबाबत योग्य ती चौकशी होऊन कारवाई न झाल्यास श्री निलेश वाळुंज यांनी पुन्हा एकदा आंदोलन, उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. चौकट- ठेकेदाराने सिलकोट न टाकल्यामुळे रस्त्याला तडे गेले आहेत.
खड्डे भरून रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून घेऊ – श्री संजय मुरकुटे (शाखा अभियंता सां.बा शिरूर )