मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता आता मात्र, करोना रुग्णसंख्या मागील आठवड्यापासून हळूहळू कमी होत आहे. देशभरातील राज्यांपैकी महाराष्ट्रात दीड कोटी लसी देण्याचा टप्पा पार केला आहे. इतक्या विक्रमी संख्येमध्ये लसीकरण करणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे.
मात्र, राज्यात सहा ते आठ महिन्यांनी करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन-सदस्यांच्या समितीकडून हे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या या इशाऱ्यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.
वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या अखेर दिवसाला दीड लाख आणि जून महिन्याच्या अखेर दिवसाला २० हजार रुग्ण आढळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तत्पूर्वीही, लसीकरण केंद्र वाढत असतानच दुसऱ्या बाजूला राज्यातील अनेक जिह्ल्यात होणारा लसींचा पुरवठा अतिशय कमी आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवर दोन ते तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. लसीकरणामध्ये आपण एवढा वेळ घालवला तर करोना नवा विषाणू निर्माण होईल ज्याच्यावर लसीचा काही परिणाम होणार नाही,” असंही या वैज्ञानिकाने म्हटलं आहे.