सर्वप्रथम सर्व नागरिक, बंधू, सभासद, खातेदार, ग्राहक, हितचिंतक यांना आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या शुभेच्छा! या दिनास जागतिक न्याय दिन असेही संबोधले जाते.
पीडितांचे अधिकार वृद्धिंगत करण्यासाठी न्यायव्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते. समाजात न्याय प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे काम न्यायव्यवस्था करत आहे.प्रत्येक देशाची देशांतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांना शिक्षा देण्यासाठी व पीडिताला न्याय देण्यासाठी स्वतःची न्याय व्यवस्था असते. पण झालेला अपराध जर जागतिक पटलावर उमटत असेल व ज्याचे स्वरूप गंभीर व मानवतेविरुद्ध असेल तर अशा पीडितांना न्याय देण्यासाठी एक वैश्विक न्याय संस्थेची गरज भासू लागली. यातूनच आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालयाचा जन्म झाला.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण 15 न्यायधीश असतात. जे संयुक्त राष्ट्र महासभा व सुरक्षा परिषदेद्वारे 9 वर्षांच्या कालावधीकरिता निवडले जातात. दर तिसऱ्या वर्षी 15 मधून 5 न्यायाधीश पुन्हा निवडले जाऊ शकतात. या बाबतीत मुख्य अट ही आहे की दोन न्यायाधीश एका देशाचे असता कामा नये. या संबंधी 139 देशांच्या न्यायव्यवस्थेने यांस मान्यता दिली आहे .
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय द हेग, नेदरलॅंड येथे आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतातील न्यायाधीश म्हणून दलबीर भंडारी हे सध्या कार्यरत आहेत. तसेच नागेंद्र सिंग, रघुनंदन स्वरूप फाटक, बी. एन. राऊ, पी. चंद्रशेखर राव यांनी देखील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतातील न्यायाधीश म्हणून भूमिका बजावलेली आहे. ही आपणांसाठी अभिमानास्पद बाब आहे.
17 जुलै ही रोम या देशाला संविधान लागू होण्याची तारीख आहे. तसेच 1 जून 2010 ला कंपाला (युगांडा) मध्ये रोमच्या संविधानाबद्दल चर्चा करण्यासाठी संमेलन आयोजित करण्यात आले. तेथील विधान सभेत अनेक पक्षांद्वारे 17 जुलै ही आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या रूपात साजरा करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला.
या दिवसाची आवश्यकता कशासाठी आहे की जागतिक स्तरावर न्यायाचे समर्थनार्थ लोकांना जागरूक व एकजूट करण्याची गरज आहे. तसेच या दिवसाचा मुख्य उद्देश पीडितांच्या अधिकारांना वृद्धिंगत करणे आहे. हा दिवस जगभरातील लोकांना गंभीर मुद्यांवर लक्ष वेधण्यासाठी आवश्यक आहे. हा दिवस समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींना शांतता व सुव्यवस्था प्रभावित केल्यास त्यांच्या होणाऱ्या गंभीर परिणामाची चेतावनी देतो.
जोपर्यंत लोकांचा मोठा समुदाय एकमेकांच्या कल्याणासाठी जबाबदारीच्या भावनेने परिपूर्ण होणार नाही तोपर्यंत समाजातील सर्व लोकांना सामाजिक न्याय कधीच मिळू शकत नाही, असे विचार हेलेन केलर या अमेरिकन तत्त्ववेत्याने मांडलेले आहे. त्यामुळे सर्वांनी बंधूभावाने व सामाजिक जबाबदारीने व कोणावरही अन्याय होणार नाही याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्याय दिवस याची प्रेरणा देतो. पुन्हा आपणा सर्वांना इंद्रायणी बॅंकेतर्फे शुभेच्छा!
– ऍड.एस.बी.चांडक