नवी दिल्ली – करोना मदत सामग्रीसाठी भारत आज जगातील विविध देशांकडे मदत मागत आहे. यावरून ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकेकाळी आपण विश्व गुरू होण्याच्या वल्गना केल्या होत्या पण आज आपल्यावर विश्व भिकारी होण्याची वेळ आली आहे असे त्यांनी एका ट्विटर संदेशात म्हटले आहे.
From Vishwa Guru we have become Vishwa Beggars. From vaccine givers we have sunk to begging for medical help.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) April 27, 2021
आपणच जगाला करोनाची लस देत होतो पण आज आपल्यावर जगाकडे औषधांची भीक मागण्याची वेळ आली आहे आपण अशा पद्धतीने डुबलो आहोत अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारताला आज जगभरातून कोविड विषयक मदत देऊ करण्यात आली आहे. अगदी पाकिस्तान आणि चीननेही भारताला मदत देऊ केली आहे. भूतान सारख्या देशातूनही आपल्याला ऑक्सिजनची मदत लागत आहे. त्याचे वर्णन सिन्हा यांनी वरील शब्दांत केले आहे.