सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांचे प्रतिपादन
वाघळवाडी -सोमेश्वर साखर कारखाना राज्यामध्ये नावारुपास आलेला आहे. कारखान्यास सलग 7 पुरस्कार मिळण्यामध्ये कामगारांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
मकरसंक्रातीच्या निमित्ताने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक मंडळाकडून कामगारांना तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप हे होते. व्हाईस चेअरमन शैलेंद्र रासकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सभासद व कामगारांच्या सततच्या सहकार्यामुळेच कारखाना आज प्रगतिपथावर गेल्याचे नमूद केले. त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, प्रतापसिंह काकडे व ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप, कैलास जगताप व संदीप भोसले यांनी आपली मते मांडली.
यावेळी संचालक उत्तम धुमाळ, लक्ष्मण गोफणे, नामदेव शिंगटे, महेश काकडे, दिलीप थोपटे, किशोर भोसले, सचिन खलाटे, विशाल गायकवाड, राहुल वायाळ कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप, कारखान्याचे कामगार संचालक बाळासाहेब काकडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक निंबाळकर यांनी केले. बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.