पाबळ – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव,तब्बल महिनाभर काम मिळेना,शेवटी पुण्या मुंबईच्या कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढीच्या बातम्या ऐकून निराश झालेले हातावर पोट असणारे मजूर आपल्या गावाकडे मोठ्या संख्येने परंतु लागले असल्याचे चित्र पुढे येत आहे.
चारशे ते पाचशे किलोमीटर पायी जायचे पण गावाला जायचेच या भावनेने मुलाबाळांसह निघालेले चाळीस किलोमीटर अंतर चालत आलेले मजूर पाबळ येथे शेतात विसावले,त्याची माहिती मिळताच पाबल येथील बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन, आस्थेने विचारपूस केली तेव्हा ते उपाशी असल्याची माहिती मिळाली,त्यानंतर तासाभरात गरम भात व गॉड शिरा तयार केला आणि या मजुरांना जेऊही घातले.
दरम्यान, आठ दिवस या सगळ्या मजुरांना गाव गाठण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे या कोरोनानं सगळ्यांनाच हतबल केलं आहे, असं चित्र आहे.