मुंबई- लॉकडाउन सुरु झाल्यापासून एका आठवड्याच्या आत मानसिक आरोग्यासंदर्भात नोंद करण्यात आलेल्या केसेसची संख्या २०% नी वाढली. या कोरोना परिस्थितीत आपल्याला घरातील कामे आणि घरुन कामे दोन्हीचा ताळमेळ बसवावा लागतो आहे. तो ताळमेळ बसवण्यात गफलत होत असल्याने ताण आणि संतापाचं प्रमाण वाढले आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दर तीनपैकी दोन व्यक्तींनी (66%) असे सांगितले की त्यांचे वाय-फाय कनेक्शन किंवा इंटरनेट अचानक बंद पडले तर त्यांना राग आणि वैताग येतो. तर 51% व्यक्तींनी मान्य केले की त्यांचा फोन चार्ज होत असताना कोणी तो अनप्लग केला तर त्यांना खूप राग येतो.
आरोग्याला अपायकारक खाणे, तणाव, बैठे काम यामुळे हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग आणि मधुमेह यासारखे आहाराशी संबंधित असंसर्गजन्य (नॉन-कम्युनिकेबल) आजार होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आरोग्याला अपायकारक आहार आणि अपुरे पोषण या जगभरात असंसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरत आहे, असं सांगितलं आहे
लाॅकडाऊनमध्ये मानसिक आरोग्य सांभाळणे ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. त्याकडे दुर्लक्ष झाले तर कोरोनापेक्षा मोठ्या आजाराला बळी पडू, असाही इशारा देण्यात आला आहे