श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये जोपर्यंत कलम 370 पुन्हा बहाल केले जात नाही तोपर्यंत आपण विधानसभेची निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. आपण जेव्हा आमदारकीची शपथ घेतली होती तेव्हा राज्यात दोन संविधान होते असेही त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना मेहबुबा म्हणाल्या की, हा त्यांच्यासाठी अत्यंत भावूक मुद्दा आहे. जेव्हा विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली जाईल त्यावेळी दोन घटना असल्या पाहिजेत. एका भारताची आणि दुसरी जम्मू काश्मीरची. एकाच वेळी तेथे दोन झेंडे असले पाहिजेत. कदाचित माझा हा न लढण्याचा निर्णय मूर्खपणाचा वाटू शकतो. मात्र माझ्यासाठी तो भावनिक मुद्दा आहे. हा विषय केवळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी आहे. संसदेच्या निवडणुकांबाबत मला कल्पना नाही.
दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
दरम्यान, जम्मू काश्मीरच्या निवडणुकांच्या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, त्या निवडणुका केव्हा होणार याबाबत काही बोलू किंवा सांगू शकत नाही कारण तो निर्णय निवडणूक आयोगाने घ्यायचा आहे. भारतीय जनता पार्टी हा केंद्रातील सत्ताधारी पक्ष तो निर्णय घेऊ शकत नाही. मात्र निवडणूक आयोग तेव्हाच निर्णय घेईल जेव्हा स्थिती भाजपला अनुकूल असेल.