काही काळापूर्वी वाळुंज परिवाराने आपल्या या व्यवसायात अनेक चढ उतार अनुभवले. यानंतर निशा यांचे वाळुंज कुटुंबाने त्यांना प्रेरित करत हा व्यवसाय ताब्यात घेण्यास सुचवले. आधीपासून असलेल्या दोन पंचतारांकित बॅंक्वेट हॉल्स आणि एक शाकाहारी रेस्टॉरेंटमध्ये काही बदल करत “राजरत्न’चे एक नवीन आगळे वेगळे रूप फेब्रुवारी 2020 मध्ये सगळ्यांसमोर आले. किचनपासून ते इतर कामं हाताळण्यापर्यंत, फायनॅन्ससाठी नवीन लोकांना रिक्रूट करण्यापासून ते रेस्टॉरेंटला वेगळे रूप देणे आणि व्यवस्थापनापर्यंत सगळं काही निशा यांनी सांभाळले. निशा यांनी या सर्व गोष्टी अतिशय धैर्याने आणि आत्मविश्वासाने हाताळल्या. त्यांच्या या गुणांबद्दल आतापर्यंत त्यांना स्वत:ला देखील कल्पना नव्हती. आता राजरत्न भारतातील प्रमुख रेस्टोरेंट्सच्या यादीत सहभागी झाले आहे.
निशा या मूळच्या महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) या गावातील आहे. या स्वयंपाक करणेव आणि खाऊ घालण्याच्या सुंदर संस्कृतीत त्या वाढल्या असल्याने हेच संस्कार त्यांनी लग्नानंतर आपल्या घरी रुजवले. त्यावेळी त्यांचे वय केवळ 17 वर्षे होते. त्यावेळी संसार आणि घरातील इतर जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडत होत्या. हे सर्व पार पाडत असताना अन्नाप्रति असलेलं प्रेम आणि आवड किंचितही कमी झाली नाही. आपल्या वडीलांप्रमाणे त्यांनी तितक्याच प्रेमाने आपल्या परिवाराला आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांना खाऊ घातले;
मात्र या सगळ्यात व्यवसायाबद्दल विचार त्यांच्यामनात कधीच आला नाही. या जबाबदाऱ्यांना आपण न्याय देऊ शकू का? असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला; मात्र तरी देखील त्यांनी हा व्यवसाय पूर्णपणे ताब्यात घेण्याचे ठरवले आणि त्यांच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली. त्यांनी एका अटीवर हा व्यवसाय आपल्या हातात घेतला, ती म्हणजे कुणीही त्यांच्या काम आणि कार्यपद्धतीतमध्ये येणार नाही. त्यांना मदतीची गरज भासली तर त्या स्वत:हून मदत मागतील.
त्यांची अट मान्य झाली आणि त्या यशाची एक एक पायरी स्वबळावर चढत गेल्या. कुटुंबासोबतच स्टाफच्या पाठिंब्यामुळे यशाची पायरी चढण्याचे आणि परिश्रम करण्याचे अधिक बळ मिळत असल्याचे निशा वाळुंज आवर्जुन सांगतात. दोन वर्षात त्यांचा स्वत:वरचा आणि त्यांच्या व्यवसायावरचा आत्मविश्वास वाढला. स्मित हास्य करत त्या सांगतात, रेस्टॉरेंटचा व्यवसाय हा पूर्णपणे माणसं आणि व्यवस्थापन या दोन गोष्टींवर आधारित असतो.
अशी कुठलीही स्कीम किंवा बिझनेस प्लॅन नाही जो प्रेम, आपुलकी आणि ग्राहकांना स्वत:च्या घरात येणाऱ्या पाहुण्यांप्रमाणे वागणूक या शिवाय काम करेल. त्यांनी हीच शिकवण त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील दिली आहे. निशा यांनी “राजरत्न एक्जिक्युटिव्ह’मध्ये काही अमूलाग्र बदल केले आहेत. तसेच त्यांनी “राजरत्न’ री-लॉंच करण्याचे देखील ठरवले असून त्यातही सर्वांच्या पाठिंब्याने त्या यशस्वी होणार हे निश्चित आहे!
गृहिणी कुठले काम करू शकत नाही? याचे उत्तर आहे असे एकही काम नाही जे एखादी गृहिणी करू शकत नाही. राजगुरूनगरच्या या गृहिणीने अनेकांना हे सिद्ध करून दाखवले आहे. वर्षी निशा राजेंद्र वाळुंज यांनी आपल्या फॅमिली रेस्स्टॉरेंटचा व्यवसाय ताब्यात घेतला. तसेच केवळ दोन वर्षांत त्यांनी या व्यवसायाला जागृतावस्थेत आणले, आणि नफ्यात 30 टक्क्यांची वाढ करून दाखवली. सतत स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवणारी एक आई, पत्नी आता 20 वर्षे जुना रेस्टॉरेंटचा व्यवसाय एकहाती सांभाळते हे नक्कीच प्रेरणादायी आहे. बिझनेस स्पिरिट ठेवत प्रेम, आपुलकी आणि मेहनतीने त्यांनी हा व्यवसाय ताब्यात घेतला. लोकांसाठी काही करता यावे या भावनेने त्यांनी आपल्या पारिवारिक व्यवसायात पूर्णपणे लक्ष घालायला सुरुवात केली आणि बघता बघता एक गृहिणी, उद्योजिका झाली.
‘लोकल ते ग्लोबल’ खास महिलांसाठी:
प्रत्येक “स्त्री’ला काहीतरी करावे वाटत असत. त्यांच्यात सर्व काही करण्याची जिद्द असते. कधी कधी त्यांचं परिस्थिती आडवी येते; मात्र त्यावर मात करून त्यांनी आत्मनिर्भय बनले पाहिजे. त्यांना आत्मनिर्भय बनविण्यासाठी “लोकल ते ग्लोबल’ हा महिलांसाठी हॉटेल “राजरत्न’च्या माध्यमातून व्यासपीठ तयार केले आहे. यासह बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे निशा वाळुंज यांनी सांगितले.