नवी दिल्ली – भारतीय महिला क्रिकेट संघाची एकेकाळची सर्वात यशस्वी गोलंदाज रुमेली धर हीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. रुमेलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत हा निर्णय कळवला.
2005 साली विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळलेल्या भारतीय संघाची सदस्य असल्याचा अभिमान आजही वाटतो. देशाकडून खेळताना संघाच्या विजयात मोलाचा वाटाही उचलता आला याचे समाधान आहे मात्र, आता नवोदितांसाठी जागा रिक्त करमे गरजेचे असल्याने आपण थांबण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दात तीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
15 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत तीने 2003 साली इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तीने भारताकडून चार कसोटी, 78 एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे.