मुंबई – अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात झालेला वाद अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर उर्फीने राज्य महिला आयोगात धाव घेत जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर महिला आयोगाने देखील याबाबत सकारात्मक दखल घेत महत्वाची पावले उचलायला सुरुवात केल्याचे दिसून येते.महिला आयोगाने यासंबंधी पोलीस आयुक्तांना महत्वाचे निर्देश दिल्याचे देखील समजते.
उर्फी जावेद प्रकरणी महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल्याचे समजते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत सदर प्रकरणी सखोल चौकशी करावी आणि त्याचा अहवाल महिला आयोगाला पाठवावा असे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,”मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी1/2 pic.twitter.com/6OL7Of0K7G
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 17, 2023
उर्फी जावेदने देखील सोशल मीडियावरून थेट चित्रा वाघ यांचा उल्लेख करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. “मी तिला धमकी दिलेली नाही,मात्र रस्त्यावर नागडं फिरण्याविरोधात धमकी दिलेली आहे. तिला काय फॅशन करायची आहे ती तिने चित्रपटात किंवा तिच्या क्षेत्रात करावी,मात्र रस्त्यावर अशा पद्धतीने फिरू नये” अशी आक्रमक प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी उर्फी बाबबत दिली होती.
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात सुरु झालेल्या संघर्षानंतर राजकारण देखील चांगलेच तापू लागले आहे. संजय राऊत यांच्यासह जितेंद्र अवघड यांनी देखील उर्फीबाबत आपले मत मांडले होते. आता राज्य महिला आयोगाने थेट मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल्याने हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.