नागपूर – आत्महत्या करण्यासाठी 50 वर्षीय महिलेने गाडीसह
तलावात उडी घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना फुटाळा तलाव येथे घडली. मात्र, पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे महिलेला जीवनदान मिळाले आहे.
पोलीसांनी पाण्यात उतरून शर्थीचे प्रयत्न करत महिलेला सुखरूप बाहेर काढले आहे. पोलीसांच्या या कार्यतत्परतेचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काैतुक केले आहे.
.@NagpurPolice दलातील पोलिसांनी फुटाळा तलावात आत्महत्या करण्यासाठी गाडीसह उडी घेतलेल्या ५० वर्षीय महिलेला स्वतः पाण्यात उतरून शर्थीचे प्रयत्न करत सुखरूप बाहेर काढले. नागपूर पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे त्या महिलेला जीवनदान मिळाले. नागपूर पोलिसांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. pic.twitter.com/Tdd34q9IFl
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 20, 2020