चांद्रयान 2 प्रकल्पामुळे दक्षिण आशियाची अवकाशात मोठी झेप
लाहोर – सध्या काश्मीर वादावरुन भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाद असला तरी भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान मोहिमेवर पाकिस्तानची पहिली महिला अंतराळवीर नरिमा सलीमने भारताचे आणि इस्रोचे अभिनंदन केले आहे.
नरिमाने भारताचे अभिनंदन करताना सांगितले की, भारताने चांद्रयान मोहिम राबवली. यामध्ये विक्रम लॅण्डरला चंद्रावर उतरविण्याचा केलेला प्रयत्नहा स्वतःहुनच एक मोठे यश असून यामुळे प्रामुख्याने दक्षिण आशिया आणि जागतीक आवकाश क्षेत्रासाठीची मोठी झेप आहे असे तीने यावेळी नमूद केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लॅंडरचे यशस्वी लॅंडिंग करण्याच्या ऐतिहासिक प्रयत्नाबद्दल मी भारत आणि इस्रोचे अभिनंदन करते.
चंद्रयान -2 हे चंद्र अभियान दक्षिण आशियासाठी खरोखरच एक मोठी झेप आहे. जी केवळ प्रदेशच नव्हे तर संपूर्ण जागतिक अवकाश क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. असे नरिमा यांनी कराचीस्थित सायंटियाना या मासिकाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नरिमा सलीमही सर रिचर्ड ब्रॅन्सनयांच्या व्हर्जिन गैलेक्टिकमध्ये अवकाशात जाणारी पहिली पाकिस्तानी महिला अंतराळवीर आहे.