पुणे: दारुड्या पतीकडून होणारा छळ तसेच सासरकडील लोकांकडून मारण्यात येणाऱ्या टोमण्यांमुळे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भारती विद्याापीठ भागात घडली. भाग्यश्री अनंता नलावडे (वय २९,रा.गगन प्रवेश सोसायटी,आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. भाग्यश्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पती अनंता भैरू नलावडे तसेच त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाग्यश्रीचा भाऊ स्वप्नील रेणूसे (वय ३२,रा.आंबेगाव पठार) यांनी यासंदर्भात भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीचा अनंता नलावडे याच्याबरोबर आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता.पती अनंता याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे तो छळ करायचा तसेच मारहाणही करायचा,असे रेणूसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.