त्रिनिदाद – भारत आणि वेस्ट इंडीजयांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीने भारताचा डाव सावरला. यामुळे भारताला वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 191 धावांचे आव्हान उभे करता आहे.
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेला सलामीवीर रोहित शर्मा आज चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. यामुळे एका बाजूने विकेट्स पडत असतानाही त्याने आपला खेळ कायम ठेवत दमदार अर्धशतक ठोकले. त्याने 44 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार खेचत 64 धावा करत भारताचा डाव सावरला. पण तो बाद झाल्यावर भारताची धावसंख्या मंदावली.
Innings Break!
A solid batting display from #TeamIndia! 👌 👌
6⃣4⃣ for captain @ImRo45.
4⃣1⃣* for @DineshKarthik.Over to our bowlers now! 👍
Scorecard ▶️ https://t.co/qWZ7LSCVXA #WIvIND pic.twitter.com/l7yZ38PtDH
— BCCI (@BCCI) July 29, 2022
यानंतर अनुभवी दिनेश कार्तिकने तुफान फटकेबाजी करत 19 चेंडूत नाबाद 41 धावा काढत भारताला 20 षटकांत 6 बाद 190 धावांपर्यंत मजल मारून दिली. वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफने दोन, तर ओबेद मकॉय, जेसन होल्डर, अकेल हुसेन आणि किमो पॉल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.