भोपाळ – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले असून रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. रुग्णसंख्येचा अचानक विस्फोट झाल्याने आरोग्ययंत्रणा कोलमडून पडलीये. ठिकठिकाणी ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स, रेमडीसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा जाणवत आहे. अनेक राज्यांमधून उपचारांअभावी रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटना उघडकीस आल्या आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी सध्या विषाणू संसर्गाची साखळी तोंडाने अत्यंत महत्वपूर्ण बनले असून यासाठी केवळ लॉक डाऊन हाच पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर आज मध्यप्रदेश सरकारने राज्यात १५ मेपर्यंत सर्वकाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते म्हणाले, “राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आपल्याला १५ मेपर्यंत जनता कर्फ्यूअंतर्गत सर्वकाही बंद ठेवावे लागणार आहे. आपण सर्व आस्थापना फार कालावधीसाठी बंद ठेऊ शकत नाही हे जरी सत्य असलं तरी १८ टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना आपण सर्वकाही सुरु ठेवण्याची जोखीमही उचलू शकत नाही.”
लग्न सोहळे सुपर स्प्रेडर
यावेळी बोलताना चौहान यांनी, लग्न सोहळे करोनाचे सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मे महिन्यात लग्न सोहळे आयोजित करू नयेत यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करा अशी विनंतीही केली.
लॉक डाऊनबाबत टास्क फोर्स म्हणते
पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून अधिक आणि आयसीयू बेड्स 60 टक्क्यांहून अधिक वापरात असणाऱ्या राज्यांना टास्क फोर्सतर्फे नाईट कर्फ्यू आणि कठोर निर्बंध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
To break the chain of transmission of corona in the state we have to completely shut everything till May 15, strict ‘Janta Curfew’. We can’t shut things for too long but with more than 18 % positivity we can’t remain open: Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan#COVID19 pic.twitter.com/eWuzBw3U0O
— ANI (@ANI) May 6, 2021