नागपूर: आज विधानसभेत आ. अनिल पाटील यांनी पुरवणी मागणी मांडताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य केले. जळगाव जिल्हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. पण मागील सरकारने काहीच केले नाही. शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, अशी माहिती सभागृहाला दिली.
मागील सरकारमुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे ऑनलाईन फॉर्म भरता आले नाही. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी आ. अनिल पाटील यांनी केली. तसेच अमळनेर येथे कृषी विद्यापीठासाठी जागा उपलब्ध असून तात्काळ विद्यापीठ उभारणीच्या कामाला सुरूवात करावी अशी मागणीही पाटील यांनी केली.