नवी दिल्ली – भारतीय सीमांमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पाकिस्तानात पिटाळताना पाकिस्ताच्या हाती लागलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांना युद्ध काळातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘वीर चक्र’ सन्मान देण्याची शिफारस भारतीय वायू सेनादलाने केली आहे.
तर बालाकोट मधील हवाई हल्ल्यातील मिराज २००० च्या १२ वैमानिकांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल, वायू सेना मेडल देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना त्यांच्या शौर्याबद्दल ‘वीर चक्र’ देण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
परमवीर चक्र आणि अशोक चक्र यानंतर वीर चक्र हा युद्ध काळातील अतुलनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान आहे.
पाकिस्तानमधून मायदेशी परत आल्यानंतर अभिनंदन वर्थमान काही दिवसांपूर्वीच पुन्हा वायू दलात सक्रिय रुजू झाले होते. त्यानंतर आज विंग कमांडर अभिनंदन यांची सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर एअरबेसवरून पश्चिम विभागातील महत्त्वाच्या एअरबेसवर पोस्टिंग करण्यात आली आहे.