पुणे – मागील काही दिवसांपासून रेल्वेकडून श्रमिक विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या कोणत्याही श्रमिक विशेष गाड्या चालवण्यात येत नसल्याचे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.
याशिवाय नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. “कोणत्याही श्रमिक विशेष गाड्या’ चालविल्या जात नाहीत किंवा याबाबतचे नियोजन केले नाही.
रेल्वे फक्त उन्हाळी विशेष गाड्या आणि नियमित विशेष गाड्या चालवण्यात येत असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.