वाघोली(प्रतिनिधी) : वाघोली ते केसनंद रोड रस्त्याचे काम बांधकाम विभागाने तीन कोटीचा निधी मंजूर करून संपूर्ण निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या रस्त्याचे ऑनलाईन उद्घाटन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते होऊन महिना झाला असून सुद्धा या रस्त्याचे कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नाही. या रस्त्यावर नागरिकांचे जीव गेल्यानंतर रस्त्याचे काम सुरू होणार का ? असा सवाल भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संदीप सातव यांनी केला आहे.
याबाबत भाजप च्या वतीने या केसनंद राहुर रोड वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हवेली तालुका क्रीडा अध्यक्ष विजय जाचक, पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश सातव, जिल्हा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव, प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश कुटे, पंचायत समिती सदस्य श्यामराव गावडे, प्रदीप सातव, शरद आव्हाळे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल शिवले,गोरख सातव, राहुल गवळी ,नितीन गाडे, सोमनाथ बहिरट बाळासाहेब कोतवाल, सुनिता आढाव ,पूजा बहिरट, नम्रता बहिरट, रेणुका झेंडे ,राधा झेंडे, पुष्पा पवार ,प्रमिला तडस ,मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.
“सार्वजनिक बांधकाम विभाग ने वाघोली केसनंद रस्त्यासाठी 3 कोटी निधी मंजूर करून निवीदा प्रक्रिया पूर्ण होऊन अनेक महिने झाले परंतु अजूनही रस्त्याचे काम चालू झाले नाही आजचे आंदोलन हे फक्त इशारा आहे आठ दिवसात काम चालू झाले नाही तर सा.बा. वि.कार्यालय वर तीव्र आंदोलन करणार याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल.”
– संदिप सातव (संघटन सरचिटणीस,पुणे जिल्हा युवा मोर्चा)
“वाघोलीतील विविध प्रश्न सोडविण्यासाठी करोना काळात देखील प्रयत्न करण्यात आले आहेत. लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे वाघोली केसनंद रस्त्याला प्रत्यक्ष कामास सुरूवात होण्यास उशीर झाला आहे. काम त्वरित सुरू करणे बाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.”
– अशोक पवार(आमदार, शिरूर हवेली)
“शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोलीतील विविध विकास होत आहेत. वाघोली केसनंद रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात येणार आहे. यात कोणीही राजकारण आणू नये.”
– बाळासाहेब सातव-गवळी (वरिष्ठ, उपाध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस)