पुणे – ऑक्टोबर महिन्यात सतत पाऊसाने शेतात तुडुंब पाणी साठले. अनेक पिके सडून गेली आहेत. पिकात साचलेल्या पाण्याने शेतकरी त्याची काढणी करू शकले नाहीत. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पुर्ण भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ट्विट करत सरकार खोचक टीका केली आहे.
अडीच महिन्यापूर्वी आलेल्या महापुरात झालेल्या नुकसानीचे मदत केंद्रसरकारकडून अजून मिळाली नाही. ही अतिवृष्टीची मदत पुढच्या पावसाळ्यापर्यंत तरी येईल काय?@thodkyaat @abpmajhatv @MiLOKMAT @bbcnewsmarathi @MySarkarnama @zee24taasnews @sakaltimes @pudharionline https://t.co/6yxbHFkbAg
— Raju Shetti (@rajushetti) November 4, 2019
दरम्यान, राजू शेट्टी यांनी ट्विट केले आहे की,’ अडीच महिन्यापूर्वी आलेल्या महापुरात झालेल्या नुकसानीचे मदत केंद्रसरकारकडून अजून मिळाली नाही. ही अतिवृष्टीची मदत पुढच्या पावसाळ्यापर्यंत तरी येईल काय? असा खोचक प्रश्नही सरकारला विचारला आहे.