पुणे – राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती उच्च शिक्षण विभागाने मागविली आहे. त्यानंतर पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक व कोकण भागांत पूरग्रस्तामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यात मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पात्र विद्यार्थ्यांची माहिती उच्च शिक्षण विभागाकडे सादर करा, अशा सूचना उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी दिल्या. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती उच्च शिक्षण विभागाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर शुल्कमाफीचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत.