नवी दिल्ली – कोरोना सारखं महाभयानक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तिमिरातून तेजाकडे जाण्याचा सल्ला दिला. म्हणजे येत्या 5 एप्रिलला रात्री 9 वाजता त्यांनी घरातील लाईट बंद करून आपल्या घराबाहेर किंवा बाल्कनीत दिवा किंवा मोबाईल टॉर्च पेटवण्यास सांगितंलं. मोदींच्या या उपक्रमानंतर आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
अशातच आता चित्रपट दिग्दर्शक फराह खानने मोदींवर ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.“लोकांनी टाळ्या वाजवल्या, घंट्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या. तसेच त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत देखील केली. आता पाच एप्रिलला मेणबत्त्या देखील पेटवतील. परंतु यामुळे परिस्थिती सुधारणार का? सरकारने देशातील एखाद्या हुशार अर्थतज्ज्ञाची मदत घ्यावी आणि घसरत जाणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेला पुर्वपदावर आणण्यासाठी काही उपाययोजना कराव्या. अन्यथा आपण रसातळाला जाऊ.” अशा आशयाचे ट्विट करुन फराहने आपला संताप व्यक्त केला आहे.