नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करीत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. 2020-2021 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरु झाले आहे .
दरम्यान, केंद्र सरकार अर्थातच मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी जी काही आश्वासने दिली, ती किती पूर्ण झाली अथवा करणार का? या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पातील निर्णयांकडेही पाहिले जाणार आहे. लोकांना या सरकारकडून फार अपेक्षा होत्या. परंतु, काही वर्षात लोकांच्या पदरात फारसे काही पडले नसल्याचा एकूण सूर दिसत आहे. परंतु, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील निवडणुकांचे निकाल डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या अर्थसंकल्पाची रचना केली गेली तर सामान्य जनतेला मोठा लाभ मिळू शकेल का, याबाबत उत्सुकता आहे. केवळ, याच एका आशेवर यावर्षीचा अर्थसंकल्प हा अच्छे दिन असणारा, आशादायक असेल अशी अपेक्षा सामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.