कुरकुंभ – दौंड तालुक्यातील वकील, डॉक्टर, पदवीधर यांना आपल्या क्षेत्रात येत असलेल्या अडचणी दिल्ली दरबारी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच दौंड तालुक्याला आर्थिक बळकटी देण्यासाठी रेल्वे, रस्ते, शेती पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सातीरामन यांनी दिले.
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन ह्या भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील पाटस (ता. दौंड) येथे शनिवारी (दि. 24) युवा उद्योजक, वकील, डॉक्टर, पदाधिकारी व जनतेशी सवांद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, दौंड येथे सर्व क्षेत्रातील पदाधिकारी वर्गाने अनेक आपल्या क्षेत्रातील विविध अडचणी येणाऱ्या समस्या मांडल्या आहेत. त्या सर्व सूचनांचे पालन नक्कीच केले करणार आहे.
दिल्लीमध्ये गेल्यावर विविध क्षेत्रातील मंत्र्यांबरोबर चर्चा करून आपल्या भागातील समस्या सोडवाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे. आमदार राहुल कुल म्हणाले की, भविष्यात पुणे येथील धरणातून शेतीला मिळणाऱ्या पाण्याची अडचण निर्माण होऊन जनतेची गणिते बिगडू नये यासाठी तालुक्याच्या शेतीसाठी अत्यन्त बारकाईने धरणाचे पाणी नियोजन होणे गरजेचे आहे. पुणे येथे नोकरीसाठी जाणारे शासकीय पदाधिकारी, कामगारांची विध्यार्थीची संख्या जास्त असल्याने तालुक्यातील लोकल रेल्वेची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, दौंड ते पुणे प्रवास करताना वेळेचे नियोजन नसल्याने व्यासायिक पदवीधारकांना सह प्रवाशांना अडचण येत असल्याने पुणे ते दौंड गाडी प्रत्येक तासासह वेळेवर जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बारामती लोकसभा प्रभारी आमदार राम शिंदे, किसान मोर्चाचे वासुदेव काळे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, विश्वास अवचट, दादासाहेब केसकसर यांसह मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते.