मुंबई – राज्यात वाढत्या कोरोनामुळं पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आता शाळा कधी सुरु होणार यावर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली. शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
शाळा सुरु ठेवा,शाळा बंद ठेवा असे दोन प्रकारचे मत प्रवाह निर्माण झाले, याशिवाय लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत 15 दिवसांचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विचाराने निर्णय घेतला जाईल असेही टोपे म्हणाले.
15 ते 18 वयोगटातील 42 टक्के मुलांना लस
, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण 90 टक्के लोकांना पहिला डोस दिला आहे. आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. आपण 62 टक्क्यांपर्यंत लोकांना दुसरा डोस दिला आहे, असं आरोग्य मंत्री म्हणाले.
जे लोकं डोस घेत नाहीत त्यांची जनजागृती करुन त्यांनाही डोस दिला जाईल. 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के मुलांना आपण लस आतापर्यंत दिली आहे, राजेश टोपे यांनी सांगितले.